spot_img
spot_img
spot_img
spot_img

परभणीत संविधानाच्या रक्षणासाठी आंबेडकरी लढा: विजयाबाईंच्या विजयाला सुप्रीम पाठिंबा.

३० जुलै २०२५: परभणीतील संविधान चौकात १०डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या संविधानाच्या विटंबनेच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने ऐतिहासिक विजय मिळवला. या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या पोलिस कोठडीतील मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. सर्वोच्च न्यायालयाने 30 जुलै 2025 रोजी ‘महाराष्ट्र राज्य विरुद्ध विजयाबाई सूर्यवंशी’ या खटल्यात वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने निकाल देत दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा केला.

10 डिसेंबर 2024 रोजी संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड झाल्याने परभणीत तीव्र आंदोलनं उसळली. यात पोलिसांनी लाठीचार्ज आणि अटकसत्र सुरू केलं. सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली, आणि कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात पोलिस मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं, तरी सरकारने ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्री आणि पोलिस महानिरीक्षकांशी थेट संपर्क साधत आंदोलन आणि अन्याय थांबवला.
सोमनाथ यांच्या अंत्यसंस्कारावेळी पोलिसांनी अँब्युलन्स अडवल्याचा अमानवी प्रकारही बाळासाहेबांनी हस्तक्षेपाने थांबवला. त्यांनी कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत आणि 1 कोटी नुकसानभरपाईची मागणी केली. औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने पाठबळ देत ऐतिहासिक निकाल दिला.
हा लढा केवळ सोमनाथ यांच्या न्यायासाठी नव्हता, तर संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी होता. विजयाबाई सूर्यवंशी यांनी पैशांचं आमिष नाकारत न्यायाचा मार्ग निवडला. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने सिद्ध केलं की, आंबेडकरी विचार आणि संविधानाच्या ताकदीने अन्यायाला हरवलं जाऊ शकतं. हा विजय प्रत्येक संविधानप्रेमी नागरिकाचा आहे, ज्याने पुन्हा दाखवून दिलं की, आवाज उठवला तरच न्याय मिळतो.

Epaper Website

Related Articles

आरएसएस मुख्यालयाजवळील संविधान चौकात आज एक महत्त्वपूर्ण आंदोलनाची सुरुवात.

आरएसएस मुख्यालयाजवळील संविधान चौकात आज एक ऐतिहासिक आणि निर्णायक आंदोलनाची सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मोठी राजकीय घडामोड

मुंबई, प्रतिनिधी :भोंदूबाबा आणि स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांमध्ये अटक झाल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मोठ्या अडचणीत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!