spot_img
spot_img
spot_img
spot_img

मुंबई मनपा निवडणुकीत मराठी समाजाची हीच शेवटची संधी: राज ठाकरे इशारा स्पष्ट—“रात्र वैऱ्याची… सावध राहा, नाहीतर निवडणूक हातातून निसटेल”

 


मुंबई मनपा निवडणुकीत मराठी समाजाची हीच शेवटची संधी: राज ठाकरे
इशारा स्पष्ट—“रात्र वैऱ्याची… सावध राहा, नाहीतर निवडणूक हातातून निसटेल”

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मतदार आणि कार्यकर्त्यांना जोरदार इशारा दिला आहे. “ही निवडणूक म्हणजे मराठी माणसासाठी शेवटची संधी आहे. थोडीशीही निष्काळजीपणा चालणार नाही. रात्र वैऱ्याची असते… गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले.

राज ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईच्या स्वाभिमानासाठी, स्थानिकांच्या हक्कांसाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. “दरवेळी निवडणूक जिंकल्या नंतर बाहेरून आलेल्या गटांची सत्ता वाढते आणि मराठी माणूस शेवटच्या रांगेत ढकलला जातो. आता हे थांबवायचे असेल तर प्रत्येक मत जागरूकतेने वापरले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

  1. आगामी दिवसांत मनसे आपला प्रचार आक्रमकपणे राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. “लक्ष विचलित करू नका. शेवटपर्यंत लढा, अन्यथा पश्चात्ताप करावा लागेल,” असा पुन्हा एकदा इशारा देत त्यांनी मराठी मतदारांना सक्रिय सहभागाची हाक दिली

Epaper Website

Related Articles

आरएसएस मुख्यालयाजवळील संविधान चौकात आज एक महत्त्वपूर्ण आंदोलनाची सुरुवात.

आरएसएस मुख्यालयाजवळील संविधान चौकात आज एक ऐतिहासिक आणि निर्णायक आंदोलनाची सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मोठी राजकीय घडामोड

मुंबई, प्रतिनिधी :भोंदूबाबा आणि स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांमध्ये अटक झाल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मोठ्या अडचणीत...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!