spot_img
spot_img
spot_img
spot_img

मुंबई मनपा निवडणुकीत मराठी समाजाची हीच शेवटची संधी: राज ठाकरे इशारा स्पष्ट—“रात्र वैऱ्याची… सावध राहा, नाहीतर निवडणूक हातातून निसटेल”

 


मुंबई मनपा निवडणुकीत मराठी समाजाची हीच शेवटची संधी: राज ठाकरे
इशारा स्पष्ट—“रात्र वैऱ्याची… सावध राहा, नाहीतर निवडणूक हातातून निसटेल”

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मतदार आणि कार्यकर्त्यांना जोरदार इशारा दिला आहे. “ही निवडणूक म्हणजे मराठी माणसासाठी शेवटची संधी आहे. थोडीशीही निष्काळजीपणा चालणार नाही. रात्र वैऱ्याची असते… गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले.

राज ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईच्या स्वाभिमानासाठी, स्थानिकांच्या हक्कांसाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. “दरवेळी निवडणूक जिंकल्या नंतर बाहेरून आलेल्या गटांची सत्ता वाढते आणि मराठी माणूस शेवटच्या रांगेत ढकलला जातो. आता हे थांबवायचे असेल तर प्रत्येक मत जागरूकतेने वापरले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

  1. आगामी दिवसांत मनसे आपला प्रचार आक्रमकपणे राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. “लक्ष विचलित करू नका. शेवटपर्यंत लढा, अन्यथा पश्चात्ताप करावा लागेल,” असा पुन्हा एकदा इशारा देत त्यांनी मराठी मतदारांना सक्रिय सहभागाची हाक दिली

Epaper Website

Related Articles

बौद्ध समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; विलास काकडेविरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० मे (प्रतिनिधी) बौद्ध समाजातील तरुणी, महिला तसेच आया-बहिणींविषयी सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या विलास...

रमाबाई ची ‘ रमाई ‘ होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग.

रमाबाई ची ' रमाई ' होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत दिनांक ४ एप्रिल १९०६ रोजी रमाबाई यांचा विवाह झाला . विवाहाच्या आधी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!