spot_img
spot_img
spot_img
spot_img

संविधान दिनी भारतीय संविधान संवर्धन सभेचे उद्घाटन.

संविधान दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद छत्रपती संभाजी नगरातील प्रख्यात हायकोर्ट वकील ॲड. बाबा सरदार यांच्या कल्पनेतून आणि स्वयंप्रेरणेने “भारतीय राज्यघटना संवर्धन सभा” या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली.

आज लोकशाहीच्या आडून लोकशाही व संविधान संपवण्याचा जो कट प्रस्थापितांनी आखलेला आहे किंबहुना लोकशाही संपुष्टात आल्याचे चित्र समोर दिसत आहे, संविधान व लोकशाही मूल्य पायदळी तुळविण्याचे कार्य आजचे सत्ताधारी व प्रस्थापितांच्या माध्यमातून सातत्याने होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने संविधानाचा जागा नव्हे तर संविधानाचे संवर्धन होणे अगत्याचे आहे, करिता ॲड. बाबा सरदार यांनी “भारतीय राज्यघटना संवर्धन सभा” या संघटनेचे स्थापना आज सावित्रीबाई फुले महाविद्यालय पडेगाव येथे केली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. शिलवंत गोपनारायण, प्रा. गौतम साळवे, डॉ. विनय हातोले, अमोल सरदार, राजू कीर्तने, महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली मोटे, डॉ. राजू वानखेडे, राम जाधव, पवन जाधव, रवी इंगळे, प्रमोद धुळे, गौतम अमृतफळे आदी मान्यवर व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Epaper Website

Related Articles

बौद्ध समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; विलास काकडेविरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० मे (प्रतिनिधी) बौद्ध समाजातील तरुणी, महिला तसेच आया-बहिणींविषयी सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या विलास...

रमाबाई ची ‘ रमाई ‘ होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग.

रमाबाई ची ' रमाई ' होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत दिनांक ४ एप्रिल १९०६ रोजी रमाबाई यांचा विवाह झाला . विवाहाच्या आधी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!